या दोन्ही स्पर्धांसाठी आठवी ते दहावी, अकरावी ते पदवी आणि खुला अशा तीन गटांत होणार आहेत. निबंध स्पर्धेच्या पहिल्या गटासाठी ‘व्यक्तिचित्रण’ (उदा. रिक्षावाले काका, फेरीवाला आदी.), ‘पराधीन आहे जगती.. पुत्र मानवाचा..’ आणि ‘आपल्या आयुष्यातील विनोदाचे स्थान’ हे विषय देण्यात आले असून, त्यासाठी ५०० शब्दांची मर्यादा आहे. अकरावी ते पदवी गटासाठी ‘अजरामर काव्यकृती- गीतरामायण’, ‘सबकुछ.. पुलं’ (‘पुलं’चे बहुआयामी व्यक्तिमत्त्व) आणि ‘मराठीचे मानबिंदू- पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर’ दे विषय असून, त्यासाठी एक हजार ते दीड हजार शब्दांची मर्यादा आहे. खुल्या गटासाठी ‘वाचकांचे हृदयस्थ पुलं’, ‘अष्टपैलू संगीतकार- सुधीर फडके आणि ‘प्रतिभावंत गदिमा’ हे विषय असून, त्यासाठी दीड ते दोन हजार शब्दांची मर्यादा आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांचे नाव पाच जानेवारीपर्यंत वाचनालयात पोहोचणे आवश्यक आहे.
कथाकथन स्पर्धेच्या आठवी ते दहावी या गटासाठी पाच ते १० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. दुसऱ्या गटासाठी १० ते १५ मिनिटे, तर खुल्या गटासाठी १२ ते २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही लेखकाची कथा चालणार आहे; मात्र ‘पुलं’ आणि ‘गदिमा’ यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही स्पर्धा असल्याने विषयाची निवड उचित राहील याची दक्षता स्पर्धकांनी घेणे आवश्यक आहे. ही स्पर्धा २० जानेवारीला सकाळी आठ वाजता नगर वाचनालायत सुरू होईल; मात्र त्यात सहभागी होण्यासाठी १० जानेवारीपर्यंत वाचनालयाकडे नाव नोंदविणे आवश्यक आहे.
‘या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन ‘पुलं’, ‘गदिमा’ आणि ‘बाबूजीं’ना मानवंदना द्यावी,’ असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
निबंध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पत्ता : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालाय, खारेघाट रस्ता, जयस्तंभ जवळ, ता. जि. रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी संपर्क : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय- (०२३५२) २२२५७०.